कवी अश्लेष माडे आंतरराष्ट्रीय साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित.


गोंदिया, दिनांक – 27 सप्टेंबर 2021 – जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम कोहमारा येथील प्रसिद्ध युवक कवी तथा पत्रकार यांना यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे 26 सप्टेंबर ला झालेल्या सोहळ्यात बेटी फॉउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वणी येथील बेटी फॉउंडेशन तर्फे प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यात देशातील नामवंत, कर्तृत्ववाण व्यक्तींना विशेष स्थान देण्यात येतो. कवी अश्लेष माडे यांच्या उत्कृष्ट कवितांची, साहित्याची दखल घेत त्यांना यंदाचा आंतरराष्ट्रीय साहित्यभूषण पुरस्कार बेटी फॉउंडेशन वणी तर्फे प्रिन्स लॉन मध्ये आयोजीत सोहळ्यात प्रसिद्ध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

उल्लेखनीय म्हणजे कवी अश्लेष माडे यांना कविरत्न, साहित्य रत्न असे अनेक महत्वाचे पुरस्कार साहित्य क्षेत्राचे प्राप्त झाले आहेत. या पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बेटी फॉउंडेशन च्या संस्थापिका अध्यक्षा प्रीती माडेकर (दरेकर) यांनी पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सर्व पुरस्कार्थिंचा अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय साहित्यभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कवी अश्लेष माडे यांचे विविध स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


 

Leave a Comment