सरकारी यंत्रणेच्या कारभाराला बळी पडलेल्या अनेक तक्रारी जनता दरबारात नागरिकांनी मांडल्या : खा : सुनील मेंढे


भंडारा, दिनांक : २३ जुलै : भंडारा येथे नागरिकांसाठी आज २३ जुलै रोजी जनता दरबार चे आयौजन जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी आपल्या समस्या मांडल्या, विविध समस्या घेऊन त्या सोडविल्या जातील या आशेने आलेल्या जिल्हयातील असंख्य नागरिकांचे खासदार सुनील मेंढे यांनी समाधान केले.

जनता दरबारात नागरिकांनी उपस्थित राहून महसूल, जिल्हा परिषद, कृषी, वीज वितरण कंपनी, घरकुल, पाणी समस्या अशा विविध विषयांवर आपल्या अडचणी मांडल्या. यातील काही तक्रारी आणि समस्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून निकाली काढल्या तर काहींच्या दृष्टीने ठराविक कालावधीत त्याचा निपटारा करण्यासाठी सूचना दिल्या. सहज सुटणाऱ्या मात्र सरकारी यंत्रणेच्या कारभाराला बळी पडलेल्या अनेक तक्रारी या जनता दरबारात नागरिकांनी मांडल्या होत्या असे खा. मेंढे यांनी सांगितले.


 

Leave a Comment

और पढ़ें