चुलबंद नदीवरील कोल्हापुरी बंधारा कठड्याविना देते अपघाताला आमंत्रण.


  • पुलावरून प्रवास करताना वाहन धारक प्रवासी. 

गोंदिया, सडक अर्जुनी, ( बबलू मारवाडे ) दिनांक – 12 जून 2021 – तालुक्यातुन चुलबंद नदी जाते, या नदीवर कोल्हापूरी बंधारे ठीक ठिकाणी तय्यार करण्यात आले आहेत, मात्र या कडे सध्या शासनाच्या वतीने दुर्लक्षित करण्यात येत आहे, या बंधाऱ्यांची वेळीच देख भाल दुरुस्ती होत नसल्याने, भंगार अवस्थेत असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे, ग्राम सौन्दड /राका मार्गावरील कोल्हापूरी बंधाऱ्याचे कठडे गेल्या पावसाळ्यात पुराणे वाहून गेल्याने या पुलावर गेली वर्षे भर्या पासून कठडे लावण्यात आले नाही, या पुलावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते अश्यात अपघाताची भीती बळावली आहे, त्या मुळे संबंधित विभागाने या कडे लक्ष घालून सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवासियातून केली जात आहे.


 

Leave a Comment