पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर वंदेभारत रेल्वेचा शुभारंभ


नागपूर, दिनांक : १२ डिसेंबर २०२२ : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळून शिंदे-फडणवीसांच सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ( ११ डिसेंबर ) रोजी नागपूर येथे नागपूर ते बिलासपूर या वंदेभारत रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला. वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूर ते बिलासपूर हे अंतर अवघ्या ६ ते साडे सहा तासांत गाठता येणे शक्य होणार आहे. सध्या हे अंतर कापण्यास ७ ते ८  तास लागतात. दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेतर्फे ही गाडी चालवली जाणार आहे. १६ कोच असणाऱ्या या गाडीची आसन क्षमता १ हजार १२८ आहे. नागपूर ते बिलासपूरदरम्यान या गाडीला फक्त गोंदिया दुर्ग व रायपूर येथेच थांबा देण्यात आला आहे.


 

Leave a Comment