अर्जुनी मोर. विधान सभा क्षेत्रात 20 ते 25 नेते कोट्यावधी रुपये खर्च करण्यासाठी रांगेत : चंद्रकांत गणवीर

सडक अर्जुनी, दि, 31 जुलै : मोरगाव अर्जुनी विधानसभा 63 अनुसूचित जाती करिता राखीव असल्यामुळे आज समाजातील पुढारी नेते पुढे सरसावले आहेत. सर्व पक्ष मिळवून 20 ते 25 नेते कोट्यावधी रुपये खर्च करण्यासाठी आज तयार आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून कितीही पैसा खर्च झाला तरी चालेल पण, आमदारकीची निवडणूक लढविणार असा मानस त्यांनी केला आहे.

यावरून लक्षात येते की, समाज काही आज मागे नाही, ज्या समाजामध्ये वीस ते पंचवीस लोक कोट्याधीश असतील तर तो समाज आज मागे कसा ? सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची  धडपड चाललेली आहे. जर याच वीस पंचवीस लोकांनी एकत्रित येऊन प्रति एक लाख रुपये प्रमाणे जमा करून जर समाजासाठी काही करण्याचे ठरविले. आणि समाजालाही आव्हान केले तर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एका दिवसात करोडो रुपये समाजातून ही जमा होतील.

त्या माध्यमातून समाजातील विकासाची कामे करण्यासाठी पुढाकार घेतला तर खरे नेतृत्व समोर येईल, कारण आप आपसात मतभेद आणि किती ही भांडण करून काही केलं तरी, एकच व्यक्ती निवडून येणार आहे, आरक्षण हे कशासाठी ? तर लक्षात येईल की मागासलेल्या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी, आरक्षणाचे प्रावधान आहे, मग विचार करा 2009 पासून आज वीस वर्षे पूर्ण होऊन ही समाजाचा विकास झाला काय?

मग याला जबाबदार कोण निवडून आलेले जनप्रतिनिधी की समाज…! असा प्रश्न सर्वसाधारण समाज बांधवांना पडलेला आहे. आरक्षण असूनही नसल्यासारखे आहे. यांच्या नाकर्तेपणामुळेच आज आपल्या समाजाकडे दुसरे लोक वेगळ्या नजरेने बघतात.

आरक्षण गेल्यावर” तेल ही गेलं तूपही गेलं हाती धुपारणे राहिले” यासारखी परिस्थिती समाजाची होईल. प्रत्येकाला च आपापल्या पक्षात उमेदवारी मागण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. पण हे करत असताना आपण कोणाचा विरोध करतो आपल्याच समाज बांधवांचे विरोध करण्यापेक्षा एकत्रित येऊन समाजापुढे काही करून दाखवून एक आदर्श निर्माण करू शकतोय, समाज नेहमीच आपल्या पाठीशी आहे. मिळालेल्या संधीचं सोनं आपण सर्व मिळून करू शकतोय असे मत चंद्रकांत गणवीर सामाजिक कार्यकर्ता यांनी पत्रकारांशी बोलताना वेक्त केले आहे. 

Leave a Comment

और पढ़ें