11 टील्लू पंप धारकावर सरपंच हर्ष मोदी यांनी केली जप्तीची कारवाई

सडक अर्जुनी, दिनांक : 13 जून 2024 : सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड ग्राम हे तालुक्यातील सर्वात मोठ गाव आहे. गावात जवळपास दहा हजार च्या वर लोकसंख्या आहे. गावातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे काम पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत सातत्याने करण्याचा प्रयत्न करते. परंतु गावातील काही नागरिक टिल्लूपंपच्या माध्यमातून नळ योजनेचे पाणी ओढण्याचे काम करत असल्याने अन्य नागरिकांना पाहिजे त्या प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही.

ही बाब ग्राम पंचायतच्या निदर्शनास आली त्यामुळे ग्रामपंचायतीने टिल्लू पंप धारकावर जप्तीची कारवाई केली आहे. ही कारवाई करण्याआधी ग्राम पंचायतने गावामध्ये पोंगा लावून नागरिकांना जागृत करण्याच्या दृष्टीने माहिती दिली होती. तसेच नोटीस बोर्डावर नोटीस देखील लावले होते. परंतु गावातील नागरिक ग्राम पंचायतीच्या आदेशाचे सर्रास पने उल्लंधन करीत सातत्याने पाणी ओढण्याचे काम करीत होते. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे बोरवेल आहेत ते सुद्धा पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या नळाला टिल्लू पंप लावून पाणी ओढण्याचे काम करीत होते.

परिणामी गावातील नागरिकांना पाहिजे त्या प्रमाणात पाणी पुरवठा होत नव्हता त्यामुळे नागरिक ग्रामपंचायतीकडे या तक्रारी सातत्याने करीत होते. त्यामुळे ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या तारखांना कारवाई करून तब्बल 11 टिल्लू पंप धारकांवर जप्तीची कारवाई केली आहे. यात देवा जनबंधू, मनोरमा राऊत, मंगेश शिवणकर, मधुकर भांडारकर, ओमप्रकाश यावलकर, सुनील यावलकर, चुनीलाल साखरे, बाबुराव यावलकर, उमेश सानेकर, मोहन चुटे, मार्कंड नंदरधने अशी टिल्लू पंप जप्त करण्यात आलेल्या नागरिकांची नावे आहेत यांच्यावर ग्राम पंचायत प्रशासन काय कारवाई करणार ते पाहण्यासारखे असेल.

दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई गावात होत असते. परंतु नियोजनबद्ध काम केल्यास पाणीपुरवठा करता येते असे सौंदड येथील सरपंच हर्ष मोदी यांनी सांगितला आहे. हर्ष मोदी तसेच ग्राम पंचायत सौंदड यांच्या आदेशावरून ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अतुल दोनोडे, याकुब पठाण, जांभुळकर यांनी कारवाई केली आहे. कारवाई करताना सरपंच मोदी स्वतः उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें