चुलबंद नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे कठळे गेली तीन ते चार वर्षे पासून गायब, अपघाताची शक्यता!
गोंदिया, दिनांक : 0 2 जून 2024 : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव येथील नागरिक आपल्या दैनंदिन कामानिमित्ताने सौंदळ गावामध्ये रोज येतात, सौंदळ मध्ये येण्यासाठी त्यांना दोन मार्ग आहेत, एक मार्ग दोन किलोमीटर अंतर तर दुसरे मार्ग पाच किलोमीटर अंतर आहे. पाच किलोमीटर अंतर असलेला मार्ग हा पळसगाव राका सौंदड असा असून दुसरे मार्ग पळसगाव ते सौंदळ असा थेट आहे. हा मार्ग अगदी जवळ असून दोन किलोमीटर अंतर आहे. मात्र सदर मार्ग हा फक्त उन्हाळ्यामध्येच वापरामध्ये येतो त्यातही संपूर्ण मार्ग कच्चा आहे तर नदीपात्रामध्ये पूल नसल्याने प्रवाशांना कच्च्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे.
एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असला तरी दुसरीकडे ग्रामीण भागातील रस्त्यांची आजही दयनीय अवस्था असल्याचे चित्र आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी या मार्गाकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. गेली अनेक वेळ वृत्तपत्रांनी सदर मार्गाच्या दैनिय अवस्था बाबत वृत्त प्रकाशित केलं मात्र याकडे कुणीही लक्ष दिले नाही.
पळसगाव येथील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी सौंदळ गावामध्ये येतात ज्यांच्याकडे दुचाकी किंवा सायकल सारखे वाहन नाही. अशा विद्यार्थ्यांना पायदळ प्रवास करावा लागतो. सौंदळ ते पळसगाव हा प्रवास दोन किलोमीटर असला तरी पावसाळ्यामध्ये हा प्रवास लांबून करावा लागतो अशातच शाळेत येणारे विद्यार्थी यांना कमालीची कसरत करावी लागते.
पळसगाव ते सौंदळ या मार्गावर चुलबंद नदी असल्याने या नदीपात्रात पावसाळ्यामध्ये पाणी भरले राहते. गावकऱ्यांच सांगणं आहे की पावसाळ्यामध्ये देखील या मार्गाने अनेक विद्यार्थी प्रवास करतात, याच परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन केले जाते अशात या मार्गावर खड्डे देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरीकडे पळसगाव राका ते सौंदळ हा जो मार्ग आहे हा तब्बल पाच किलोमीटर अंतर आहे. या मार्गावर कोल्हापुरी बंधारा चुलबंद नदीवर तयार करण्यात आला आहे. सदर बंधाऱ्याला गेले तीन ते चार वर्षे पासून कठळे नसल्याने सदर पुलावर देखील अपघाताची भीती आहे. सदर पूल हा अरुंद असल्याने एका वेळेस दोन अवजड वाहन या मार्गाने जाऊ शकत नाही.
हा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. नवेगावबांध कडे जाण्यासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. याच मार्गाने सौंदळवरून साकोलीकडे जाणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच तालुक्यातील मोठ गाव असल्यामुळे परिसरातील भदूटोला, पळसगाव, राका, पिपरी, चिखली, कनेरी, मनेरी, खोबा, कोकणा या सह अनेक गावातील नागरिक या मार्गाने प्रवास करतात.
या मार्गावर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पुलावर कठड नसल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित केले आहेत. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी याकडे सातत्याने दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे. सदर पुलावर अनेक वेळा अपघात देखील झाले आहेत. मात्र कुंभकर्णी निद्रा अवस्थेत असलेले संबंधित विभागाचे अधिकारी आणि जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. सदर मार्गावर फुलाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
