गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दी. 04 डिसेंबर : बाबासाहेब आम्हा सगळ्यांच्या हृदयात जिवंत असेल पाहिजे. फक्त भाषण दिल्याने बाबासाहेब राहू शकत नाही. बाबासाहेब आत मध्ये असले पाहिजे. त्यांचे विचार आत मध्ये असले पाहिजे. समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय यावर आधारित या देशाला समतादृष्टीत समाजाची निर्मिती करण्यासाठी ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं दान केलं.
ज्या तथागत गौतम बुद्धांनी प्रज्ञा सील आणि करुनेचा धम्म आम्हाला दिला. मुंगीला साखर आणि कुत्र्याला भाकर अशी ज्या समाजाची अवस्था होती. त्या समाजाला माणसात आणण्याचे काम परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्यांना आपण कधी विसरलो नाही पाहिजे. असं मत राज्याचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मंचावरून वेक्त केले ते दिनांक 3 डिसेंबर रोजी गोरेगाव तालुक्यातील ग्राम तुमसर येथे आयोजित कार्यक्रमात मंचावरून अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी मंचावर शारदा ताई बडोले, माजी आमदार हेमंत पटले, जिल्हा परीषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत, डॉ. भुमेस्वर पटले, आदी मान्यवर होते. माजी पालक मंत्री राजकुमार बडोले यांच्या वतीने महापरिनिर्वाण दिनाचे अवचित्त साधून गोरेगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या तुमसर गावात प्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर यांच्या भीमगीतांचे आयोजन करण्यात आले होते.
सोबतच माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या युगंधर क्रिएशन च्या वतीने देखील तयार करण्यात आलेल्या भीम गीतांचे सादरीकरण करण्यात आले. असून या कार्यक्रमाला हाजरोच्या संखेत समाज बांधवानी हजेरी लावत भीम गीतांचा आनंद घेतला. यावेळी बुध्दविहार चालविणाऱ्या अनेक संस्थां चालकांचा सत्कार राजकुमार बडोले मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाला नागरिकांसह अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी अनिरुद्ध वणकर यांचे आणि त्यांच्या टीम ने गीतांचे सादरीकरण केले.
