महापुरुषांचे विचार डोक्यात उतरवून आचरणात आणले पाहिजे : नगरसेवक दाणेश साखरे


अर्जुनी मोरगाव, दी. ३० नोव्हेंबर : शिक्षण आणि अनुभवाने माणूस मोठा होतो. आपण खूप शिकलो, आर्थिक सुबत्ता मिळवली मात्र सामाजिक दायित्व म्हणून आपली काय जबाबदारी? हे भान असावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला. आम्ही शिकलो स्वतासाठी, समाजाच्या हितासाठी संघटित कधी झालो नाही आणि संघर्ष मात्र माझ्यापेक्षा कुणी मोठा होऊ नये म्हणून केला. माणसाने माणूस म्हणून जगले पाहिजे यातच खरा आनंद आहे. महापुरुषांचे विचार डोक्यात उतरवून आचरणात आणले पाहिजे. सर्व सांगतात डॉक्टर बना, इंजिनियर बना, धनवान बना. पण हे सर्व करताना आपण माणूस बनून जगलो पाहिजे असे विचार अर्जुनी नगरपंचायत चे नगरसेवक दाणेश साखरे यांनी व्यक्त केले.

ते तालुक्यातील निमगाव येथे मंडई निमित्त दुय्यम खडा तमाशा या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून बोलत होते. सरपंच वंदेश्वरी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ओमप्रकाशसिंह पवार, प्रा. अनिल गायकवाड, माधव चचाने, संदीप कापगते, तंटामुक्त समिती अध्यक्ष गोपाल ठाकरे, वर्षा गेडाम, देवला कापगते, माजी सरपंच गीता मेश्राम, छाया खोब्रागडे, मनोहर बाळबुद्धे कैलास पुस्तोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नानेश्वर गोंधळे, आभार डॉ. सुखदेव राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक मंडळांनी परिश्रम घेतले.


 

Leave a Comment

और पढ़ें