पोलिस पाटील पद भरती प्रक्रियेवर स्थगिती चे आस्वासण; जिल्हाधिकारी आणि उप विभागीय अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव?


  • ओबीसी आंदोलनाचा तिडा कायम ?
  • पोलिस पाटील पदांच्या ९५ जागांकरीता ९४३ अर्ज प्राप्त…
  • पडताळणीअंती ७२ अर्ज प्रलंबित ४३ उमेदवारांचे अर्ज ठरले अपात्र.. 

सडक अर्जुनी, ( बबलू मारवाडे/ सुरेन्द्र कुमार ठवरे ) दी. २६ : पोलीश पाटील पद भरती प्रक्रिया ओबीसी आरक्षनाला घेऊन आंदोलन मुळे वादाच्या भोवऱ्यात असताना देखील लेखी परीक्षा घेण्याचे काम जोमत चालू आहे, गोंदिया आणि तिरोडा येथील परीक्षा संपन्न झाल्याची माहिती मिळत आहे. तर अर्जुनी मोरगाव उपविभागीय कार्यालय अंतर्गत पुढील कार्यक्रम सुरू झाला आहे.

अर्जुनी मोरगाव उपविभागीय कार्यालय अंतर्गत सडक अर्जुनीच्या २७ तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ६८ पोलीस पाटील पदाकरिता बिंदू नामावलीनुसार आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर दिनांक ८ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यात एकूण ९५ पदाकरिता तब्बल ९४३ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जाची तपासणी पडताळणी करून 943 अर्जांपैकी ८२८ अर्ज पात्र ठरविण्यात आले तर 43 अर्ज अपात्र करून ७२ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वरूणकुमार शहारे यांनी दिली.

प्रलंबित असणाऱ्या अर्जाची तलाठी ग्रामसेवक यांच्या मार्फत स्थानिक रहिवासी असल्याची चौकशी करून संबंधित अर्जदारांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत २९ सप्टेंबर पर्यंत पुर्ततः करण्याच्या सूचना देण्यात आले आहे. अन्यथा दिलेल्या वेळेत कागदपत्रांची पूर्तता न केल्यास त्या उमेदवारांना अपात्र यादीत टाकले जाईल. यादी नमूद उमेदवारांचे पुरावे किंवा कुठल्याही बाबतीत कुणाला आक्षेप उजर तक्रार अथवा हरकत असल्यास याबाबत दिनांक ४ ऑक्टोंबर २०२३ दुपारी १ वाजेपर्यंत उपविभागीय कार्यालय अर्जुना मोर येथे सादर करावा तसेच पात्र प्रलंबित यादी प्रमुख उमेदवारांचे स्थानिक चौकशी करून घेण्यात येईल.

सर्वाधिक अर्ज महागाव आणि चान्ना बाक्टीत आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा निर्माण करण्यात आली होती. तालुक्यातील महागाव आणि चान्ना बाक्टीत खुल्या प्रवर्गासाठी जागा आरक्षित झाल्यानंतर अर्जदारांनी मोठ्या प्रमाणात आपले अर्ज सादर केले. तालुक्यातून सर्वाधिक अर्ज महागाव तथा चान्ना बाक्टी या दोन्ही गावातून समसमान २८ अर्ज कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. तर सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी तेली येथे २५ आणि घोटी इथून २६ सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

दिनांक २१ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात पोलीस पाटील पदभरती २०२३ करिता अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी च्या २७ जागांसाठी आरक्षण जाहीर झाले. जाहीर झालेल्या आरक्षणा नुसार त्या – त्या गावातील अर्जदारांना अर्ज करण्याच्या संधी देण्यात आल्या मात्र ग्राम खोकरी त्याचबरोबर ग्राम तिरखुरी येथे अनुसूचित जातीकरता आरक्षित होते. कोरंभिटोला आर्थिक दुर्बल घटकांतरीता बोळदा कवठा इतर मागासवर्गीय करिता मांडोखाल आर्थिक दुर्बल घटकांकरिता येथे आरक्षित झालेल्या जागेकरिता केवळ प्रत्येकी एकमेव अर्ज प्राप्त झाला. तर सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम बोळूदा येथे १ अर्ज प्राप्त आहे. या उमेदवारांना लेखी परीक्षेत ४५ टक्के म्हणजेच ३६ गुण घेणे अनिवार्य असेल तथा तोंडी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

आम्हाला कुठलेही पत्र आलेले नाही… 

लेखी परीक्षेची तारीख अध्याप नीचित नशल्याने माध्यमांना ती तारीख सांगण्यात आली नाही, तसे लेखी परीक्षेची तारीख २७,७, २०२३ च्या जावक क्र ; ५०१/२०२३ नुसार शनीवार २३ सप्टेंबर २०२३ होती, मात्र ती लेखी परीक्षा अध्याप होण्यास आहे, त्या मुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यात समन्वय नशल्याचे चित्र पाहन्यासाठी मिळत आहे. १८ सप्टेंबर रोजी गोंदियात झालेल्या ओबीसी आंदोलन दरम्यान उपजिल्हा अधिकारी खंडाईत यांनी जिल्हाधिकारी सुट्टीवर अशल्याचे सांगत जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्याशी आपण फोनवर चर्चा केली आहे.


https://fb.watch/nf_nHIQ1vf/?mibextid=2Rb1fB


त्या अनुसंघाने संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात पोलिस पाटील भरती प्रक्रियेवर स्थगिती राहील, आणि जिल्हा अधिकारी साहेब आल्याननंतर आम्ही माहिती तपासून आणि पुढील प्रक्रिये ची माहिती दिली जाईल असे आस्वसण त्यांनी दिले होते, हा ओबीसी आरक्षण बाबद मुद्दा होता, विशेष म्हणजे अर्जुनी मोर उपविभाग अंतर्गत पोलीस पाटील भरतीचे ऑनलाइन अर्ज करण्याची सेवटची तारीख २० सप्टेंबर २०२३ होती, बातम्या पाहून अनेकांनी भरती प्रक्रियेवर स्थगिती देण्यात आली अशल्याने, आणि आपले फी ची रक्कम वाया जाणार या भीतीने अर्जच केल नाही, उप विभागीय अधिकारी वरुण कुमार शाहारे यांना आम्ही फोन वरुण विचारणा केली असता त्यांनी सांगितले की स्थगिती बाबाद आम्हाला काही माहीत नाही. आम्हाला कुठलेही पत्र आलेले नाही.  त्या मुळे आमची भरती प्रक्रिया सुरू आहे. ओबीसी आंदोलनाला प्रशासनाणे हलक्यात घेतल्याचे यावरून स्पस्ठ होते.


प्रशासनाच्या वतीने आंदोलन स्थळी आस्वासन देण्यात आले होते की पोलीश पाटील पद भरती प्रक्रियेवर संपूर्ण जिल्ह्यात स्थगिती म्हणून आणि आता चाल ढकल करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. प्रशासण जर आपल्या आस्वासनावर कायम राहत नसेल तर संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या पोलीश पाटील भरती रद्द करण्या बाबाद आंदोलन करू : बबलू कटरे, ओबीसी संघर्ष समिति जिल्हा अध्यक्ष गोंदिया. 


 

Leave a Comment

और पढ़ें