५ कोटी ७२ लाख रुपयाचा धान खरेदी घोटाळा, संचालक सह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, १५ आरोपी फरार


  • आमदार विनोद अग्रवाल यांचा पाठपुरावा… 

गोंदिया, दि. १३ ऑगस्ट २०२३ : गोंदिया शहराला लागून असलेल्या ग्राम चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेने शासकीय धान खरेदी केंद्रावर खरीप व रब्बी हंगामात खरेदी केलेल्या एकूण २८ हजार ५९ क्विंटल धानाची अफरातफर करून ५ कोटी ७२ लाख ४० हजार ६२५ रुपयांचा घोळ करून शासनाची फसवणूक केली असल्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन चे अधिकारी विवेक इंगळे यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी संस्थेच्या ११ संचालकांसह ४ कर्मचारी अशा एकूण १५ जणांवर गुन्हा ( ०९ ऑगस्ट ) रोजी दाखल केला आहे.

गोंदिया जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ च्या वतीने हमी भावाने सहकारी संस्थांच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी केला जात असून शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करणाऱ्या संस्थांना प्रति क्विंटल कमिशन देण्यात येत असून या संस्थांनी केंद्रावर खरेदी केलेला धान जिल्हा मार्केटींग फेडरेशन राईस मिलर्ससह करार करून भरडाई करून सी एम आर च्या नावावर तांदूळ शासकीय गोदामात जमा करतात.



मात्र चुटीया गावातील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेने गेल्या खरीप हंगामात खरेदी केलेला १२ हजार ६३ किलो व रब्बी हंगामातील १५ हजार ९९६ क्विंटल असा एकूण २८ हजार ५९ क्विंटल १३ किलो धान एकूण किमत ५ कोटी ७२ लाख ४० हजार ६२५ रुपयांचा धान फेडरेशनकडे जमा केला नाही.

तर दुसरी कडे खरेदी केलेला धान या संस्थेच्या गोदामात शिल्लक नाही. त्यामुळे या संस्थेच्या संचालक व कर्मचाऱ्यांनी ५ कोटी ७२ लाख ४० हजार ६२५ रुपयांच्या धानाची अफरातफर करून शासनाची फसवणूक केली असल्यामुळे जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यामध्ये श्रीराम अभिनव सहकारी संस्थेचे ११ संचालक व कंप्युटर ऑपरेटर, ग्रेडर, केंद्र प्रमुख असे एकुण १५ लोकांचा समावेश आहे. त्यांच्या विरुद्ध कलम ४०९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहेत

दुसरीकडे चुटिया गावातील शेतकर्यानी आमदार विनोद अग्रवाल यांच्या कडे श्रीराम अभिनव संस्थेंची तक्रार केली असून आमदार मोहोदयांनी सदर प्रकारांची दखल घेतल्याने स्वतः जिल्हाधिकऱ्याच्या दालनात जाऊन अधिकर्यांना खडे बोल सुनावले नंतर जिल्हा प्रशासनाला जाग आल्याने श्रीराम अभिनव संस्थे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे श्रीराम अभिनव संस्थेकडे खरीप हंगामाचे १२ हजार ६३ किलो व रब्बी हंगामातील १५ हजार ९९६ क्विंटल धान्य शिलक असताना सुद्धा जिल्हा पणन अधिकऱ्यानी कुणाच्या दबावात श्रीराम अभिनव संस्थेला धान्य दिला आहे. असा आरोप शेतकर्यानी केला आहे. तर श्रीराम अभिनव संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष कपिल राणे हे आमदार विनोद अग्रवाल यांच्या चाबी संघटनेचे पदाधिकारी असला तरी त्याच्यावर कठोर कार्यवाही व्हायला पाहिजे असे आमदार विनोद अग्रवाल यांचे म्हणणे असून श्रीराम अभिनव संस्थेच्या ११ संचालकांसह ४ कर्मचारी अशा एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर सर्व आरोपी फरार आहे. त्यामुळे फरार संस्था चालकाना पोलीस कधी अटक करते हे पाहण्यासारखे असेल.


 

Leave a Comment

और पढ़ें