- सौंदड येथील नागरिकांचा कंपनीला निवेदनातून इशारा
सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 22 जुलै 2023 : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर सध्या जीव घेणे खड्डे पडले आहेत. त्या मुळे प्रवाशी व नागरीकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या मार्गाची तात्काळ दुरूस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. हा नागपुर ते रायपूर महामार्ग आहे. सध्या या मार्गावर अनेक ठिकाणी ब्रीज निर्मितीचे कार्य सुरू आहेत. याच राष्ट्रीय मार्गावरील ग्राम सौंदड ते फुटळा येथे सुध्दा ब्रीज निर्मितीचे कार्य राजदीप बिल्डकॉम नामक कंपनी करीत आहे.
हे ही वाचा : अंगावर विज पडल्याने 55 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
ज्या ठिकाणी पुल निर्मितीचे कार्य चालू आहे. अश्या जागेतील रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे. त्यातच येथे तासोंतास वाहनांचा लांबा जाम लागते त्या मुळे स्थानिक नागरिक सदर बांधकामाला कंटाळले आहेत. 21 जुलै रोजी सदर कंपनी च्या अधिकाऱ्यांना सौंदड येथील गावकऱ्यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की. सौंदड येथील ओव्हर ब्रिज निर्मितीचे काम गेली पाच वर्षे पासून चालु आहे.
ते अध्यापही पुर्ण झाले नाही. गावातुन जाणार्या महामार्गावर खुप जास्त प्रमाणात वाहतुक असते. त्या वाहतुकी मुळे गावातील मोठा तलाव ते आपल्या कंपनी पर्यंतचा मार्ग हा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. अश्यात प्रवाश्यांना जिव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे कोणतीही जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करीता आज गावातील नागरिकांच्या मार्फत निवेदन देण्यात येते की सदर मार्ग आश्वासन न देता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा.
अन्यथा रस्ता पाच दिवसाच्या आत दुरुस्त न झाल्यास गावकऱ्यांच्या मार्फत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी राजदीप बिल्डकॉन प्रा. लि. या कंपनी ची राहील. असा निवेदनातून इशारा देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी जिल्हा परिषद सदस्या निशा तोडासे, शुभम जनबंधु ग्रां. पं. सदस्य सौंदड, आशीष राऊत, वृषभ राऊत, सुरेश डोंगरवार, प्रणय राऊत, भरत चांदेवार, उमेश बनकर, पराग लाडे आदी पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.
