- कृषी साहाय्यक राजशेखर राणे यांचा आरोप.
- विलास शिवणकर यांच्या मुळे जिल्ह्यातील एकमेव कृषी सहाय्यक कार्यालय बंद.
सडक अर्जुनी, दिनांक 09 जुलै 2023 : तालुक्यातील ग्राम बाम्हणी / ख. येथे कृषि सहाय्यक कार्यालय गेली अनेक दिवसा पासून चालू आहे. हे कार्यालय गोंदिया जिल्ह्यातील एकमेव कृषि सहायक कार्यालय आहे. जे की आता माजी पंचायत समिती चे उप सभापती विलास शिवणकर यांच्या हस्तक्षेपामुळे तसेच त्यांच्या जाचाला कंटाळून बंद करण्यात आला असा आरोप कृषी सहाय्यक राजशेखर राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
ते पुढे म्हणाले. कृषि विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकर्यांना शासकीय योजनांची माहिती मिळावी तसेच आधुनिक शेती नवीन तंत्रज्ञान शेतकर्यांना मिळावे यासाठी काही गावे सलग्न करून कृषि सहाय्यकाची नियुक्ती केली जाते.
कृषि सहाय्यक म्हणून माझी नियुक्ती गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम डोंगरगाव डेपो या मुख्यालयी २०१७ या साली झाली होती. माझ्या कडे ८ गावांचा कार्यभार सोपवण्यात आला होता. जास्तीत जास्त शेतकर्यांना शासकीय योजनांची माहिती तसेच आधुनिक शेती नवीन तंत्रज्ञान शेतकर्यांना मिळावे या साठी मी स्व-खर्चाने कृषि सहायक कार्यालय उघडण्याचा निर्णय घेतला.
२०१८ साली जिल्ह्यातील एकमेव कृषि सहायक कार्यालय सुरु मी सुरु केला. या कार्यालयात शेतकर्यांना बसण्याची, संघणकाची, संघणक चालक, शेतीविषयक पुस्तके, मासिक वाचनालय व्यवस्था प्रात्यक्षिके, महिला शेतकरी शेतीशाळा, कीटकनाशके सुरक्षित हाताळणी शेतकरी सहलीचे आयोजन शेतकरी मेळावे, अनुदानित ट्रॅक्टर, ट्रॅक्टर अवजारे, प्लास्टिक मल्चिंग, शेततळे, शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे ऑनलाईन कामे या कार्यालयाच्या माधमातून या पूर्वी केली जात होती.
परंतु पंचायत समिती चे माजी उप सभापती विलास शिवणकर यांच्या हस्तक्षेपामुळे तसेच विनाकारण चे माहिती अधिकार, खोट्या तक्रारी, निलंबनाच्या धमक्या, जाचाला कंटाळून राजशेखर राणे यांनी कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले. या पुढे शेतकर्यांनी मला मोबाईल वर संपर्क करावा असे आवाहन सुधा केले.
१ जुलै रोजी कार्यालयाचे सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण करून कृषि सहायक कार्यालयाचे लावलेले बोर्ड उतरविण्यात आले. त्या प्रसंगी प्रगतशील शेतकरी प्रवीण तवाडे, गोपाल जमदाळ, किशोर तरोने, कोमल भेंडारकर , शुभम मेश्राम, नरेश जमदाळ, लोकेश तरोने, प्रवीण तवाडे, शामराव चुटे, शंकर खोटेले, टिकाराम चुटे, हेमराज लंजे, चंद्रशेखर सुरसाऊत , विश्वनाथ तरोने, किशोर कोरे ,चंद्रकुमार बहेकार, हेमकृष्ण लंजे नेहमी प्रमाणे कामे घेऊन कार्यालयात आले होते. परंतु कार्यालय बंद झाल्याची त्यांना माहिती होताच शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. असे विविध आरोप कृषी सहाय्यक राजशेखर राणे यांनी केले आहेत.
कृषी सहाय्यक राजशेखर राणे यांनी माझ्यावर केले सर्व आरोप खोटे आहेत. त्यांची प्रशासकीय बदली 31 मे 2023 रोजी झाली आहे. ते ग्राम कोयलारी येथे नवीन पदभार सांभाळणार आहेत. त्या मुळे त्यांनी सदर कार्यालय बंद केले आहे. ग्राम बामनी येथील कृषी कार्यालय शासकीय नसून ते खाजगी आहे. : विलास शिवणकर, माजी उप सभापती, पंचायत समिती, सडक अर्जुनी.
