गोंदियात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची उपक्रम


गोंदिया, दिं. 09 जुलै : महाराष्ट्र राज्यामध्ये फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळत आहे. स्वतःच्या स्वार्थापोटी विरोधक देखील हात मिळवणी करत सत्ता स्थापन करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदारांमध्ये एक संतापाची लाट निर्माण झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झाला आहे का ? माझ्या मताला काही किंमत नाही का ? असा सवाल उपस्थित करत एक सही संतापाची हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

08 जुलै रोजी गोंदिया शहरातील नेहरू चौक येथे हा उपक्रम मनसेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी मनीष चौरागडे मनसे जिल्हाध्यक्ष सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें