- तालुका तहसीलदारांचे पत्रकारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष?
- दोन्ही यौजना मिळून तालुक्यात एकूण राशन कार्ड ची संख्या 23 हजार 314 आहे. तर दोन्ही योजनेतील एकूण लाभार्थी 93 हजार 882 इतके आहेत. महिन्याला 6 लाख 13 हजार 23 किलो धान्याचे वाटप करण्यात येते.
सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) ता. 03 जुलै 2023 : शासनामार्फत नागरिकांना दर महिन्याला रास्त भाव दुकानातून तांदूळ, गहू आणि साखरेचे वाटप केले जाते. मात्र ज्या गोडाऊन मधून राशन – राशन दुकान धारका पर्यंत पोहचविले जाते. अश्या धान्य गोडाऊन ची आणि पार्कीग ची देखील दयनीय अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे ज्या पार्किंग मध्ये महिन्याला शेकडो अवजड वाहने उभी असतात. त्या पार्किंग ची देखील दयनीय अवस्था झाली आहे.
गोंदिया जिल्ह्याील सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येणारे ग्राम सौंदड येथे महाराष्ट्र शासनाचे शासकीय धान्य गोडाऊन आहे. हा धान्य गोडाऊन ब्रिटिशांच्या काळातील आहे. काही जाणकारांनी सांगितले की या वास्तूचे बांधकाम 1930 पूर्वी झाले आहे.
गोंदिया ते चंद्रपूर रेल्वे मार्ग याच धान्य गोडाऊन च्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे. ब्रिटिशांच्या काळात निर्माण झालेल्या या वास्तूचे आजही गोडाऊन म्हणून प्रशासन वापर करते. मात्र या वास्तूची देखभाल दुरुस्तीकडे जिल्हा आणि तालुका प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. गेली अनेक वर्षे पासून प्रशासनाने या वास्तूची रंग रांगोटी वा साधी दुरुस्ती देखील केल्याचे चित्र दिसत नाही. महिन्याला या धान्य गोडाऊन मध्ये 150 ते 200 लहान मोठे वाहन ये जा करतात.
तालुक्यात शासनाच्या वतीने विविध राईस मिल मध्ये सीएमआर यौजने अंतर्गत तांदळाची भरडाई केली जाते. हा भरडलेला तांदूळ याच शासकीय गोडाऊन मध्ये जमा केला जातो. गोडाऊन किप्पर नितीन कांबळे यांनी दिलेल्या माहिती नुसार वर्षाला या ठिकाणी 2 लाख 43 हजार क्विंटल तांदळाची आवक होते. तर हा साठवलेला तांदूळ बाहेरील जिल्ह्यात सुध्दा पाठविला जाते. नागरिकांना महिन्याला वाटप होणारा तांदूळ, गहू, साखर आणि शासनाने वेळोवेळी नियोजित केलेला शिधा वाटप वस्तूंचे देखील साठवणूक याच शासकीय धान्य गोडाऊन मध्ये केले जाते.
सडक अर्जुनी तालुक्यात 108 गावे आहेत. त्यात 114 राशन दुकान दारांना याच गोडाऊन मधून धान्याचा पुरवठा केला जातो. या गोडाऊन मध्ये काम करणारे शेकडो कामगार आहेत. त्यातच राशन दुकानदार तसेच राईस मिल धारक देखील येथे आपल्या कामानिमित्त येतात. असे असले तरी या ठिकाणी साध्या स्वछता गृहाची देखील निर्मिती करण्यात आलेली नाही.
नियमित वाहनांच्या वाहतुकी मुळे पावसाळ्यात पार्किंग परिसर सर्वत्र चिखलमय होते. खाली पडलेल्या धान्याला कोंब फुटल्याचे चित्र आहे तर काही ठिकाणी जमिनीवर पडलेले धान्याची सडलेली वास येते. असेच चालू राहिल्यास या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांवर देखील आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या मुळे प्रशासनाने वेळीच खबरदारी घेत कामगारांना सोई सुविधा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे.
राष्ट्रिय महामार्ग क्रमांक. : 53 वरून सौंदड रेल्वेटोली कडे जाणाऱ्या मार्गाने हनुमान मंदिर जवळून शासकीय धान्य गोडाऊन कडे जाण्याचा मार्ग आहे. या मार्गाची देखील दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे. ज्या मार्गाने वर्षाला हजारो वाहन चालतात त्याची दुरुस्ती कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तालुका तहसिलदार यांना वरील विषय बाबद माहिती विचारली असता त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.
तालुक्यातील 114 दुकान धारकांना होते राशन चे वाटप.
तालुक्यात एकूण 108 गावे आहेत. तर 114 राशन दुकाने आहेत. यात प्रामुख्याने दोन यौजनेत अंतर्गत लाभार्थ्यांना राशन मिळतोय. एक अंतोदय यौजना तर दुसरी प्राधान्य कुटुंब यौजना आहे.
तालुक्यात अंतोदय यौजने मध्ये एकूण 8 हजार 613 राशन कार्ड आहेत. तर 33 हजार 291 लाभार्थी या योजनेचा लाभ घेतात. अंतोदय यौजने मध्ये प्रती कार्ड 35 किलो धान्याचे वाटप केले जाते. यात तांदूळ, गहू आणि साखरेचा समावेश असतो. यात महिन्याला 3 लाख 1 हजार 455 किलो धान्याचे वाटप केले जाते. तर 8 हजार 613 किलो साखरेचे देखील वाटप केले जाते.
तालुक्यात प्राधान्य कुटुंब यौजनेत 14 हजार 701 राशन कार्ड आहेत. तर 60 हजार 591 यौजनेचा लाभ घेणारे लाभार्थी आहेत. या यौजनेत प्रती वेक्तीला 5 किलो धान्याचे वाटप केले जाते. यात गहू आणि तांदळाचा समावेश असतो. तर या योजनेतील लाभारत्यांना साखर मिळत नाही.
दोन्ही यौजना मिळून तालुक्यात एकूण राशन कार्ड ची संख्या 23 हजार 314 आहे. तर दोन्ही योजनेतील एकूण लाभार्थी 93 हजार 882 इतके आहेत. महिन्याला 6 लाख 13 हजार 23 किलो धान्याचे वाटप करण्यात येते. तालुका फूड इन्स्पेक्टर पोचिराम कापडे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे.
