खासदार सुनील मेंढे यांची त्या चार मृतकांच्या कुटुंबाला सांत्वन भेट


गोंदिया, दि. 01 जुलै : विहिरीची साफसफाई करण्यासाठी विहिरीत  उतरलेल्या चौघांचा 28 जून रोजी विषारी वायूमुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. खेमराज साठवणे, प्रकाश भोंगाडे, सचिन भोंगाडे आणि महिंद्र राऊत असे मृतव्यक्ती चे नाव आहेत. 30 जुन रोजी मृत कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी तिरोडा तालुक्यातील सरांडी या गावास खा. सुनील मेंढे यांनी भेट दिली. यावेळी आधी ज्या ठिकाणी घटना घडली, त्या ठिकाणी जाऊन विहिरीचे निरीक्षण केले व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी घटनेच्या अनुषंगाने माहिती जाणून घेतली.

त्यानंतर चारही मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. खा. सुनील मेंढे यांनी सांगितले की मी एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि राज्य सरकार मृतक कुटुंबाच्या पाठीशी आहे. शासनाकडून स्वर्गीय ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी दिले. सरांडी ग्रामपंचायत ला भेट देऊन यावेळी इतरही काही विषयांवर त्यांनी चर्चा केली.

यावेळी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, जि. प. सदस्या रजनी कुंभरे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम भाऊ कटरे, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, प. स. सभापती कुंता पटले, कृउबास उपसभापती भुमेश्वर रहांगडाले, तहसीलदार गजानन कोकडे, तालुका कृषी अधिकारी पी. एन. जिभकाटे, भाजपा शहर युवा मोर्चा अध्यक्ष अमोल तितिरमारे, प. स. सदस्या प्रमिला भलावी, कृउबास संचालक डॉ. गोवर्धन चव्हाण, बाला वहिले, घनशाम पारधी, प्रतिमा जैतवार, सरपंच मिता दमाहे, शीतल तिवडे, माजी उपसभापती विजय डिंकवार, दीपक पटले, किशोर दमाहे, अरविंद कांबडी, संजय पारधी, दिनेश लिल्हारे, राजू दमाहे, डॉ. रामप्रकाश पटले, रामसागर धावडे ग्रा. प. सदस्य व गावकरी उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें