उष्णतेमुळे 24 तासांत 35 जणांचा मृत्यू 200 हून अधिक रूग्णालयात दाखल.


मुंबई, दिनांक : १८ जून : बिहारमध्ये कडक उन्हाचा कहर सुरु असून ही उष्णता आता जीवघेणी बनली आहे. सामना या वृत्तपत्राने दिलेल्या माहिती नुसार, गेल्या 24 तासांत पाटण्याच्या दोन मोठ्या रुग्णालयांमध्ये 35 रुग्णांचा मृत्यू झाला तर 200 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल झाले आहेत. उन्हाच्या प्रकोपामुळे रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलेल्या 16 जणांचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे सर्वजण अत्यंत गंभीर अवस्थेत उपचारासाठी पोहोचले होते. उष्माघात, उलट्या-जुलाब, रक्तदाब कमी होणे, उच्च ताप आणि तीव्र डोकेदुखी यांसारख्या आजारांमुळे त्यांचा मृत्यू झाला. उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही अचानक वाढली आहे. काही अतिगंभीर रुग्णांचाही मृत्यू होत आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें