मुंबई, दी. 15 जुन 2023 : राज्याच्या महसूल विभागातील तब्बल साठहून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास काढण्याचे काम राज्यातल्या या अतिगतिमान सरकारने केल्याचा आरोप सामना या वृत्तपत्राने आज बातमी प्रकाशित करून केला आहे.
ते पुढे लिहितात. यामध्ये प्रामुख्याने तहसीलदारांचा समावेश आहे. शासनाच्या विविध विभागांतील बदल्या दिवसाढवळ्या होतात, पण दिवसभर ‘महसूलवाढी’ मध्ये व्यस्त असलेल्या महसूल विभागाने पहाटेच्या सुमारास बदल्यांच्या ऑर्डर जारी केल्या. मंत्रालयात झालेल्या या रात्रीच्या खेळाबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात येत आहे.
मंत्रालयातल्या सर्वच विभागांमधील बदल्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. बदल्यांमध्ये पारदर्शक धोरण असल्याचे सांगण्यात येते. पण महलूस विभागाच्या बदल्या कधीही शासनाच्या वेबसाईटवर दिसत नाहीत. अत्यंत गुपचूप पद्धतीने बदल्या होतात असेही आरोप समनावरून करण्यात आले आहे.
