मुंबई, वृतसेवा, दिनांक : १४ मे २०२३ : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे सपशेल फेल गेले असून, 224 पैकी तब्बल 136 जागा जिंकत काँग्रेस पक्षाला दणदणीत बहुमत मिळाले आहे.
भाजपला अवघ्या 65 जागा मिळाल्या. द्वेषाचे आणि खुनशी राजकारण करणारी भाजपची प्रवृत्तीच कर्नाटकातील जनतेने ठेचून काढली. जातीय आणि धार्मिक वाद निर्माण करण्यासाठी भाजपने ‘ जय बजरंग बली’ चा नारा दिला. मात्र, बजरंग बली काँग्रेसला पावला असून, भाजपच्या डोक्यात गदा हाणली आहे. असी टीका सामना या वृत्त पत्राने भाजवर केली आहे. नुकतेच वृत्त वेबसाईट वर प्रकाशित झाल आहे.
फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या भाजपला धडा मिळाल्यामुळे सर्व विरोधी पक्षांसह देशातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
काँग्रेसने भाजप आणि जेडीएसच्या 75 जागा हिरावल्या आहेत. 2018 मध्ये या जागा भाजप, जेडीएसने जिंकल्या होत्या. त्यात भाजप 52, जेडीएस 23 जागांचा समावेश आहे.
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ कर्नाटकातील सात जिह्यांतून गेली. त्यात 48 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील 32 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. म्हणजे स्ट्राइक रेट आहे 66 टक्के.
सामान्य माणसांकडून हुकूमशाहीचा पराभव! उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
हा कर्नाटकातील जनतेचा विजय आहे. आम्ही प्रेमाने ही लढाई लढलो आणि जनतेनेही दाखवून दिले की, देशाला प्रेम हवे आहे. कर्नाटकातील द्वेषाचा बाजार बंद झाला आणि प्रेमाची दुकाने उघडली आहेत. जनतेला आम्ही पाच आश्वासने दिली होती. ती पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करू.
> राहुल गांधी
जनतेचं लक्ष भरकटवणारं आणि जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारं राजकारण या देशात आता चालणार नाही. आता जनता जागरूक झाल्याने त्यांना त्यांचं लक्ष विचलित करणारं राजकारण नको आहे.
> प्रियंका गांधी
मुख्यमंत्रीपदाचे दावेदार
सिद्धरामय्या
सिद्धरामय्या यांनी 2013 ते 2018 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. सिद्धरामय्या हे एकूण आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
लोकांना फोडाफोडी आणि खोक्यांचे राजकारण आवडत नाही, शरद पवार यांचा भाजपवर निशाणा
डी. के. शिवकुमार
हे कॉँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री होण्याचे खूप जुने स्वप्न त्यांचे आहे. 2018 ला त्यांची संधी हुकली होती. सलग आठ वेळा ते आमदार आहेत.
बंगळुरूपासून दिल्लीपर्यंत जल्लोष
काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, ढोल-ताशे वाजवत जल्लोष साजरा केला. पेढे, मिठाई वाटण्यात आली. भाजपच्या कार्यालयांवर सन्नाटा पसरला होता. दिल्ली मुख्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला. सोशल मीडियावर भाजपविरोधात मीम्स वायरल झाले होते.
पक्षीय बलाबल
136 काँग्रेस
65 भाजप
19 जेडीएस
